पत्र
पत्र ! पूर्वीपासून चालत आलेलं आणि काळाच्या ओघात मागे पडलेलं संवादाच एक साधन , किंबहुना एक प्रभावी माध्यम . फार पूर्वी राजे - महाराज्यांच्या काळात निरोप पोहोचवण्यासाठी खलिता पाठवत . दोन काठ्यांमध्ये कापड अडकवून त्यावर हस्तलिखित केलेला मजकुर म्हणजे अगदी ' रॉयल कारभार ' ! त्यानंतरच्या काळात पत्रांचा नियमित वापर केला जाऊ लागला . घरी पत्र घेऊन येणाऱ्या पोस्टमनकाकांची आतुरतेने वाट बघितली जाऊ लागली . ८ - १० दिवस हा साधारण पत्र पोहोचण्यासाठी लागणारा वेळ . पण किती उत्सुकता , कौतुक त्या पत्राचं . किती तो आनंद ! कधी सुखाची तर कधी दुःखाची बातमी घेऊन येणारी ती पत्र , कधी कौटुंबिक तर कधी सामाजिक , कधी बाहेरगावी राहणाऱ्या कर्त्या पुरुषाने घरी लिहिलेलं खुशालीच पत्र तर कधी प्रेयसिने चोरून आपल्या प्रियकराला लिहिलेलं पत्र . जगाच्या पटलावरच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा पण त्यांना जोडणारा त्यावेळच्या महत्वाचा दुवा म्हणजे पत्र ! हळूहळू नवे शोध लागत गेले आणि पत्र मागे पडू ...